हानिकारक आणि प्रदूषणकारी रासायनिक खते आणि रासायनिक कीटकनाशके यांच्यावापरा ऐवजी ‘वैज्ञानिक गो आधारित शेती’ विषयक जनजागृती आणि प्रशिक्षण देणारा प्रकल्प.
शेतीसोबत जोडधंदा म्हणून फायद्यातील दुग्ध व्यवसाय करण्यासाठी जनावरांचे शास्त्रीय संगोपन कसे करावे याचे प्रशिक्षण शेतकऱ्यांच्या गोठयावर जाऊन देणारा प्रकल्प.
पंढरपूर वारीमध्ये वारकऱ्यांनी प्लास्टिक, थर्माकोलच्या डिशेस, ग्लास, कप्स ऐवजी नैसर्गिक पानांपासून बनवलेल्या पत्रावळी वापराव्यात या विषयी जनजागृती करणारा प्रकल्प.
पुणे शहरातील मंदिरात दररोज तयार होणाऱ्या निर्माल्याचे संकलन करून त्याची भुकटी करून त्यापासून नैसर्गिक, सुगंधी अगरबत्ती तयार करण्याचा प्रकल्प.
पर्यावरणास हानिकारक असलेले प्लास्टिक नागरिकांनी फेकून देऊ नये तर पुनर्वापर प्रक्रियेस द्यावे या विषयी जनजागृती करणारा आणि प्लास्टिक संकलन करणारा प्रकल्प.
पंढरपूर वारीदरम्यान दररोज हजारो टन निर्माल्य तयार होते. ते संकलित करून त्यापासून सेंद्रिय खत तयार करून वारीमार्गातील शेतकऱ्यांना मोफत वितरित करणारा प्रकल्प.
वारीमार्गातील लहान गावांवर वारीदरम्यान मोठा ताण येतो. हा ताण सुसह्य करण्यासाठी प्रथम टप्प्यात ३३ गावांमध्ये विविध ग्रामसुधार उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.
श्रीक्षेत्र आळंदी मध्ये दररोज मोठ्या प्रमाणात निर्माल्य तयार होते. ते संकलित करून त्यापासून सेंद्रिय खत तयार करून परिसरातील शेतकऱ्यांना मोफत वितरित करणारा प्रकल्प.
प्लास्टिक प्रदूषणाबाबत शालेय विद्यार्थ्यांना जागृत करणे आणि त्यांच्या घरातील प्लास्टिक संकलित करण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे.
गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा केला जावा यासाठी पुणे शहरात अनेक उपक्रम गणेशोत्सवादरम्यान राबवले जातात.
ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना “गो आधारित वैज्ञानिक शेती” कशी केली जाते याचे प्रात्यक्षिकासहित प्रशिक्षण देणारा हा पथदर्शी प्रकल्प आहे.
भारतीय गो वंशाचे संवर्धन आणि जतन करणे, गो आधारित उत्पादनांची निर्मिती करून महिलांची रोजगार निर्मिती करणे यासाठी ‘गोशाळा’ हा प्रकल्प राबवला जात आहे.
पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुराच्या वेळी आणि कोरोना साथी मध्ये रुग्णालये आणि संस्थांना वैद्यकीय साहित्य पुरवण्यासाठी विशेष मोहीम राबवली गेली.
पाण्याची बचत करण्यासाठी हॉटेल्स, उपाहारगृहांमध्ये स्टील प्लेट्स ऐवजी नैसर्गिक पानांपासून तयार केलेल्या प्लेट्स वापरल्या जाव्यात यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे.
सर्वसामान्य नागरिक तसेच शालेय विद्यार्थी यांच्यामध्ये पर्यावरण विषयक जागृती करण्यासाठी व्याख्याने, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा यांचे वर्षभर आयोजन केले जाते.
तरुणांना राष्ट्रभक्तीची आणि सामाजिक कर्तव्यांची प्रेरणा देण्यासाठी व्याख्यानमाला आणि विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.
Copyright 2022 | Thum Creative Paryavaran Dakshata Kruti Manch | Website designed by Digital Canvas